माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आज वाढदिवस. अटलजी यांचे एक राजकारणी त्यातही पंतप्रधान म्हणून मुल्यमापन अनेक आयामांमधून करण्यात आले आहे. त्यांची भाषणे, कविता तसेच अन्य लिखाण आणि एकंदरीतच व्यक्तीमत्वाचाही विविधांगी मागोवा घेण्यात आला आहे. मात्र अटलजींचे काव्य, त्यांचे जीवन आणि आजचे राजकीय संदर्भ नव्याने तपासून पाहिले असता काही अभिनव बाबींचे आपल्याला आकलन होते. आज याबाबतच….
अटलजींनी आपले काव्य, त्याप्रती असणारे प्रेम आणि अंत:स्फुर्तीवर अनेकदा भाष्य केले आहे. यातच एकदा ते म्हणतात, “मेरी कविता जंग का ऐलान है, पराजय की प्रस्तावना नही। वह हारे हुए सिपाही का नैराश्य-निनाद नहीं, जूझते योद्धा का जय-संकल्प है। वह निराशा का स्वर नहीं, आत्मविश्वास का जयघोष है” यामध्ये त्यांनी आपले जीवन आणि काव्यातील अतुट संबंध काही शब्दांमध्ये अतिशय चपखलपणे नमुद केला आहे. काव्यातील हाच ‘आत्मविश्वासाचा जयघोष’ त्यांना आपल्या वाटचालीत उभारी देणारा ठरला. अनेक चढउतार अनुभवत आणि हलाहल पचवून यशाचे गौरीशंकर गाठतांनाही त्यांना कधी अहंकाराने ग्रासले नाही. खरं तर अटलजी हे फार मोठे कवि नाहीत. त्यांच्याकडे उत्तुंग प्रतिभा आणि जगाला चकीत करणारे शब्द भांडारही नव्हते. काव्याच्या कसोटीवर मूल्यमापन केले असता हे अन्य मान्यवरांच्या तुलनेत कुठेही टिकू शकणार नाहीत. मात्र सहा दशकांपेक्षा जास्त राजकीय आणि सामाजिक वावरतांना संवेदनशीलपणे अनुभवलेल्या क्षणांसाठी त्यांनी विलक्षण सुलभ अभिव्यक्तीचा वापर केला आहे. वाजपेयी घराण्यातच काव्याचा तेजस्वी वारसा होता. त्यांचे आजोबा हे संस्कृत तर वडील खडीबोली आणि ब्रज भाषेतील रचियते होते. अर्थात कालानुरूप अटलजींनी सुलभ हिंदीचा वापर केला. जी अगदी प्रवाही अगदी समर्पक शब्दांत सांगायचे तर प्रासादिक म्हणून वाखाणण्यात आली. त्यांच्या प्रारंभीच्या सृजनावर हिंदीतील विख्यात कवि तथा त्यांचे मित्र डॉ. शिवमंगलसिंग सुमन यांचा प्रभाव असल्याचे समीक्षकांचे मत आहे. अगदी त्यांची विख्यात ‘गीत नया गाता हू’ ही कविता तर थेट सुमन यांच्याच शैलीत सादर करण्यात आली आहे.
टूटे हुए तारों से फूटे बासंती स्वर,
पत्थर की छाती में उग आया नव अंकुर,
झरे सब पीले पात,
कोयल की कूक रात,
प्राची में अरुणिमा की रेख देख पाता हू्ं।
गीत नया गाता हूँ्।
टूटे हुए सपनों की सुने कौन सिसकी?
अंतर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी।
हार नहीं मानूँगा,
रार नहीं ठानूँगा,
काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ्।
गीत नया गाता हूँ्।
यातील ‘हार नहीं मानूँगा, रार नहीं ठानूँगा’ या दुर्दम्य आशावादाने काळाच्या कपाळावर आपली कर्तृत्वगाथा लिहण्याचा संकल्प त्यांच्या काव्यात सर्वत्र आढळतो. अगदी भाजपची स्थापना झाल्यानंतर त्यांनी उत्स्फुर्तपणे काढलेले ‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा’ हे वाक्य तर काळानेच पुढे खरे ठरविल्याचे आपण पाहिले आहे. याचप्रमाणे ‘दांव पर सब कुछ लगा है, रूक नही सकते । टूट सकते है मगर हम झुक नही सकते ॥’ अशा पध्दतीने परिस्थितीशी निकराने झुंज घेण्याची सकारात्मकता त्यांच्या काव्यात आहे. अटलजी स्वत: ज्या विचारांच्या मुशीत घडले त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सांस्कृती राष्ट्रवाद हा त्यांच्या काव्यात आपसूकच स्त्रवला. यात राष्ट्र आराधनासह भारतमाता, आसेतु-हिमाचल राष्ट्रीय ऐक्य, बलशाली राष्ट्राची उभारणी, अखंड भारत आदी प्रतिमांचा मुक्त वापर करण्यात आला आहे. मात्र यात फक्त इतिहासाचेच गौरवगान नसून दाहक वर्तमान आणि उज्ज्वल भविष्यालाही तितकेच महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. ‘दिन दूर नहीं खंडित भारत को पुनः अखंड बनाएँगे। गिलगित से गारो पर्वत तक आजादी पर्व मनाएँगे॥’ या पंक्ती याच्याच निदर्शक आहेत. तर त्यांच्या काव्यात काही वैयक्तीक अनुभुतीदेखील आहेत.
चौराहे पर लुटता चीर
प्यादे से पिट गया वजीर
चलूँ आखिरी चाल कि बाजी छोड़ विरक्ति सजाऊँ?
राह कौन सी जाऊँ मैं?
सपना जन्मा और मर गया
मधु ऋतु में ही बाग झर गया
तिनके टूटे हुये बटोरूँ या नवसृष्टि सजाऊँ मैं?
राह कौन सी जाऊँ मैं?
दो दिन मिले उधार में
घाटों के व्यापार में
क्षण-क्षण का हिसाब लूँ या निधि शेष लुटाऊँ मैं?
राह कौन सी जाऊँ मैं ?
या कवितेत निर्णयातील जटिलतेचा सनातन मनोसंघर्ष रंगविण्यात आला आहे. मात्र भावना आणि कर्तव्यातील संघर्षात कुठल्या मार्गाचा अंगिकार करावा हे त्यांना ज्ञात आहे. म्हणूनच ते स्पष्टपणे म्हणतात:-
आग्नेय परीक्षा की
इस घड़ी में-
आइए, अर्जुन की तरह
उद्घोष करें :
“न दैन्यं न पलायनम।”
अर्थात आयुष्यातील अनेक कटू प्रसंगांमधूनही त्यांनी कधी पलायनवाद स्वीकारला नाही. मात्र समकालीन राजकारणातील काही बाबींमुळे त्यांची अस्वस्थता काव्यातून स्त्रवते तेव्हा कठोर प्रहारदेखील करते.
कौरव कौन
कौन पांडव,
टेढ़ा सवाल है।
दोनों ओर शकुनि
का फैला
कूटजाल है।
धर्मराज ने छोड़ी नहीं
जुए की लत है।
हर पंचायत में
पांचाली
अपमानित है।
बिना कृष्ण के
आज
महाभारत होना है,
कोई राजा बने,
रंक को तो रोना है।
या ओळी आजच्या स्थितीवर मार्मिक भाष्य करणार्या नव्हेत काय? अर्थात आजच्या युगातल्या ‘कृष्णाविना महाभारता’तल्या कोलाहलात अटलजींसारख्या उत्तुंग व्यक्तीमत्वांची महत्ता अजूनच ठसठशीतपणे अधोरेखित होते. आपल्या आयुष्यात यशासाठी काळाशी झुंज घेत शिखर गाठण्याचा आशावाद बाळगणारे अटलजी हे मात्र यशस्वी झाल्यावर जमीनीशी जुळलेली नाळ तुटू नये अशी ईश्वराजवळ प्रार्थना करतात.
धरती को बौनों की नहीं,
ऊँचे कद के इन्सानों की जरूरत है।
इतने ऊँचे कि आसमान छू लें,
नये नक्षत्रों में प्रतिभा की बीज बो लें,
किन्तु इतने ऊँचे भी नहीं,
कि पाँव तले दूब ही न जमे,
कोई कांटा न चुभे,
कोई कलि न खिले। न वसंत हो, न पतझड़,
हों सिर्फ ऊँचाई का अंधड़,
मात्र अकेलापन का सन्नाटा।
मेरे प्रभु!
मुझे इतनी ऊँचाई कभी मत देना,
गैरों को गले न लगा सकूँ,
इतनी रुखाई कभी मत देना।
यशाच्या शिखरावरील विलक्षण एकीकीपणाची अनुभुती घेणार्या वाजपेयींच्या या ओळीला स्वानुभुतीचा आयाम आहे. आकाशाला गवसणी घालतांना जमीनीचे नातेदेखील तितकेत महत्वाचे असल्याचेही त्यांनी यातून स्पष्ट केले आहे. विशेषत: सध्याच्या राजकारणातील स्वमग्न उन्मत्तपणाच्या पार्श्वभूमिवर त्यांचा हा नम्रपणा विशेष उठून दिसतो. त्यांच्या ‘आओ फिर से दिया जलाये’ आदींसारख्या काही कविता तर जनमानसात चांगल्याच रूजल्या आहेत. अनेकदा त्यांचे उध्दरण होते. यातील ओळी दुर्दम्य आशावादाच्या प्रतिक बनल्या आहेत. आज अटलजी अत्यंत विकल अवस्थेत आहेत. आयुष्यभर सार्वजनिक जीवनात व्यतीत केलेल्या आणि विशेषत: आपल्या ओजस्वी भाषणांनी देशवासियांना मंत्रमुग्ध करणार्या या महान व्यक्तीमत्वाचा ‘आवाज’ व्याधींनी हिरावून घेतलाय, काळाचा हा क्रूर खेळच मानावा लागेल. स्वत: त्यांनी आपल्या एका कवितेत वार्धक्याची चाहूल अशी व्यक्त केली आहे.
जीवन की ढलने लगी सांझ
उमर घट गई
डगर कट गई
जीवन की ढलने लगी सांझ।
बदले हैं अर्थ
शब्द हुए व्यर्थ
शान्ति बिना खुशियाँ हैं बांझ।
सपनों में मीत
बिखरा संगीत
ठिठक रहे पांव और झिझक रही झांझ।
जीवन की ढलने लगी सांझ।
आज आयुष्याच्या उत्तरायणात या नेत्याच्या मनात नेमके काय असेल हो? मला तर अटलजींसोबत आज अशाच जर्जरावस्थेच्या स्थितीत असणारे जॉर्ज फर्नांडीसही अवचितपणे आठवले…आणि काळाचा महिमाही जाणवला !
यातच अत्यंत विकल अवस्थेत असणार्या अटलजींची ही कविता बरेच काही सांगून जाणारी आहे.
मैंने जन्म नहीं मांगा था,
किन्तु मरण की मांग करुँगा।
जाने कितनी बार जिया हूँ,
जाने कितनी बार मरा हूँ।
जन्म मरण के फेरे से मैं,
इतना पहले नहीं डरा हूँ।
अन्तहीन अंधियार ज्योति की,
कब तक और तलाश करूँगा।
मैंने जन्म नहीं माँगा था,
किन्तु मरण की मांग करूँगा।
बचपन, यौवन और बुढ़ापा,
कुछ दशकों में ख़त्म कहानी।
फिर-फिर जीना, फिर-फिर मरना,
यह मजबूरी या मनमानी?
पूर्व जन्म के पूर्व बसी—
दुनिया का द्वारचार करूँगा।
मैंने जन्म नहीं मांगा था,
किन्तु मरण की मांग करूँगा।
भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भावपुर्ण श्रद्धांजली..
दि. १६/८/२०१८
छान लेख सर